वस्तुस्थिती आणि परंपरेने लादलेल्या नियमांपलीकडे मी घडत होते, ही या रानभाज्यांची खूप मोठी देण आहे!
रानभाज्यांबद्दल बोलताना तज्ज्ञ किंवा त्यावर काम करणारे लोक म्हणतात की, या भाज्या खाल्ल्या जात नाहीत म्हणून संपत आहेत किंवा इतरांना त्यांची माहिती व्हावी म्हणून स्पर्धा-प्रदर्शने आयोजित करणारे खूप लोक आहेत; परंतु एवढ्याने त्याचे संवर्धन होणार नाही. गावपातळीवरच यांचे संवर्धन होणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. एक महत्त्वाची जैव बँक किंवा बियाणे बँक म्हणूनही या भाज्या अस्तित्वात राहणे, हे महत्त्वाचे आहे.......